तमिळनाडू सरकारची ऐतिहासिक घोषणा: हिंदी वगळता भारतीय भाषांसाठी नवा राष्ट्रीय पुरस्कार
तमिळनाडू सरकारने भारतीय साहित्यविश्वात एक महत्त्वाची आणि अभिनव पहल केली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी चेन्नई येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याच्या समारोप समारंभात एका नव्या राज्यप्रायोजित साहित्यिक पुरस्कार योजनेची घोषणा केली.या पुरस्काराचे नाव “सेम्मोज़ि इलक्किय विरुधु” (शुद्ध भाषा साहित्य पुरस्कार) असे असून, हिंदी वगळता इतर प्रमुख भारतीय भाषांतील उत्कृष्ट साहित्यिक कृत्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
भाषिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन साहित्यिक उत्कृष्टतेला मान्यता देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे, असे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी स्पष्ट केले.
![]() |
| मुख्यमंत्री एम. के. स्टालिन |
“सेम्मोज़ि इलक्किय विरुधु” पुरस्काराची वैशिष्ट्ये :
- हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे.
- या पुरस्काराचा दर्जा राष्ट्रीय स्तरावरील असेल.
- प्रत्येक भाषेतील निवड झालेल्या उत्कृष्ट साहित्यिक कृत्याच्या लेखकाला ₹5 लाखांची रोख रक्कम देण्यात येईल.
- भाषिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन साहित्यिक उत्कृष्टतेला मान्यता देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश
पहिल्या टप्प्यात समाविष्ट भाषा :
या पुरस्काराच्या पहिल्या टप्प्यात खालील सात भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे:- तमिळ
- तेलुगू
- कन्नड
- मल्याळम
- ओडिया
- बंगाली
- मराठी
" चालू घडामोडींचा अभ्यास करताना नियमित current affairs सोबत
वार्षिक Year Book चा वापर केल्यास विषयांची पुनरावृत्ती अधिक प्रभावी होते. "
Simplified Year Book 2026 – Amazon वर उपलब्ध
UPSC / MPSC प्रिलिम्ससाठी महत्त्वाचे मुद्दे :
- सेम्मोज़ि इलक्किय विरुधु हा तमिळनाडू सरकारने सुरू केलेला राज्यप्रायोजित साहित्यिक पुरस्कार
- प्रत्येक भाषेसाठी पुरस्काराची रक्कम ₹5 लाख आहे.
- पहिल्या टप्प्यात ७ भाषा समाविष्ट आहेत.
- पुरस्काराची निवड प्रक्रिया स्वतंत्र तज्ज्ञ समित्यांमार्फत केली जाईल; यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसेल.
नक्की वाचा :


0 टिप्पण्या